Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

21 हजारांवरून थेट 7वा क्रमांक! MPSC Drugs Inspector परीक्षेच्या निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह

By Team Lagav Batti / July 28, 2026

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक अर्थात ‘Drugs Inspector’ पदाच्या भरती प्रक्रियेवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते मेहबूब शेख यांनी तीन उमेदवारांच्या निकालांची आकडेवारी समोर ठेवत या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. मेहबूब शेख यांच्या सोशल मीडिया पोस्टनुसार, डिसेंबर 2025 मध्ये FDA Chemical Analyst आणि DMER Pharmacist Group C या परीक्षा झाल्या होत्या. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांनी, मार्च 2026 मध्ये Drugs Inspector पदासाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षांच्या निकालांची तुलना करताना काही उमेदवारांच्या रँकमध्ये मोठी तफावत दिसून येत असल्याचा दावा शेख यांनी केला आहे.

त्यांनी दिलेल्या उदाहरणांनुसार, पायल लांडे यांची FDA Chemical Analyst परीक्षेतील रँक 10,210 होती, तर Drugs Inspector परीक्षेत त्यांना 31वा क्रमांक मिळाला. ऋतुजा अमृत पाटील यांना DMER Pharmacist Group C परीक्षेत 94 गुणांसह 21,222वी रँक मिळाली होती. मात्र Drugs Inspector परीक्षेत 155 गुणांसह त्यांनी 7वा क्रमांक मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. तर सागर रामलिंग थिटे यांना DMER Pharmacist Group C परीक्षेत 94 गुणांसह 21,160वी रँक मिळाली होती. Drugs Inspector परीक्षेत 150 गुणांसह त्यांना 14वा क्रमांक मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. या निकालांमधील तफावत संशय निर्माण करणारी असल्याचे म्हणत शेख यांनी स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. डिजिटल फॉरेन्सिक ऑडिट, सर्व्हर लॉग्स आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी करून चौकशीचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, संबंधित उमेदवारांचे सत्ताधारी पक्षातील नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र, केवळ फोटो किंवा ओळखीच्या आधारे कोणालाही दोषी ठरवता येणार नाही, असे शेख यांनी स्पष्ट केले आहे. आता या आरोपांवर MPSC आणि राज्य सरकार काय भूमिका घेते, याकडे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

Previous

NEETपासून भरती परीक्षांपर्यंत पेपरफुटीला आता ब्रेक! केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Next

‘आरक्षण हटवा’ आंदोलनाची देशभर चर्चा; भारतात आरक्षण खरंच रद्द होऊ शकतं का? संविधान आणि कायदा काय सांगतो?

Related Posts

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

Leave a Comment / Uncategorized / By Team Lagav Batti
Saina Nehwal

सायना नेहवालने गुडघ्याच्या गंभीर आजारामुळे घेतली निवृत्ती

Leave a Comment / Uncategorized, क्रीडा / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top