Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

महाराष्ट्रावर महादुष्काळाचे सावट; फक्त ८५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा, शेतीसाठी पाणीपुरवठा बंद

By Team Lagav Batti / June 16, 2026

राज्यात पावसाने ओढ दिल्याने पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. जून महिन्याचा अर्धा कालावधी उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने राज्यातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. सध्या राज्यातील प्रमुख प्रकल्पांमध्ये केवळ २४.७४ टक्के जलसाठा शिल्लक असून, हा साठा पुढील ८५ दिवसांपुरताच पुरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने शेतीसाठी पाणीपुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. उपलब्ध पाण्याचा वापर प्रामुख्याने पिण्याच्या गरजांसाठी राखून ठेवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.


विभागनिहाय पाहता, अमरावती विभागात ३८.०३ टक्के, नागपूरमध्ये ३६.५३ टक्के, कोकणात ३०.७० टक्के, संभाजीनगरमध्ये २७.८३ टक्के, नाशिकमध्ये २५.२० टक्के, तर पुणे विभागात केवळ १४.५७ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जलसाठ्यात सुमारे ५ टक्क्यांची घट झाली आहे. राज्यातील २० जिल्ह्यांमधील साडेतीन हजारांहून अधिक गावे आणि वाड्या सध्या जवळपास एक हजार पाणी टँकरवर अवलंबून आहेत. पाऊस आणखी लांबल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई, नवी मुंबई, पनवेल, भिवंडी आणि पुणे यांसह अनेक शहरांमध्ये पाणी कपातीला सुरुवात झाली असून, नागरिकांना पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous

NEET पुनर्परीक्षेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णय; भारतात टेलिग्रामवर 22 जूनपर्यंत निर्बंध

Next

विधान परिषद निवडणूक : ११ जागांसाठी आज मतदान, २२ जूनला निकाल

Related Posts

यूपीमध्ये नायलॉन मांजामुळे होणारा मृत्यू आता हत्या मानली जाणार; योगी आदित्यनाथांचा अधिकाऱ्यांना इशारा

यूपीमध्ये नायलॉन मांजामुळे होणारा मृत्यू आता हत्या मानली जाणार; योगी आदित्यनाथांचा अधिकाऱ्यांना इशारा

Leave a Comment / पर्यावरण / By Team Lagav Batti
Trade deal आहे तरी काय? भारतीय कृषी क्षेत्रासाठी 400 अब्ज डॉलर्सची संधी

Trade deal आहे तरी काय? भारतीय कृषी क्षेत्रासाठी 400 अब्ज डॉलर्सची संधी

Leave a Comment / पर्यावरण / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top