Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

रिक्षाचालकांना मराठी सक्तीची! RTO रस्त्यावर उतरलं; १५ ऑगस्टनंतर थेट कारवाई

By Team Lagav Batti / May 26, 2026

मुंबईसह राज्यभरातील रिक्षा आणि टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य केल्यानंतर आता परिवहन विभागाने प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे. रिक्षाचालकांना मराठी बोलता आणि समजता येतं का, याची खातरजमा करण्यासाठी आरटीओ अधिकारी थेट रस्त्यावर उतरले असून विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.


राज्य सरकारने यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की, प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सीचालकांना स्थानिक भाषा म्हणजेच मराठी येणं आवश्यक आहे. सुरुवातीला एक मेपासून मराठी न बोलणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र त्यानंतर चालकांना मराठी शिकण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला.
आता प्रादेशिक परिवहन विभागाने या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. अधिकाऱ्यांकडून रस्त्यावर रिक्षा थांबवून कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. यामध्ये वाहनाचे कागदपत्र, चालकाचा परवाना तपासण्यासोबतच चालकांशी थेट मराठीत संवाद साधून त्यांना भाषा समजते का, हे पाहिलं जात आहे.
या मोहिमेदरम्यान रिक्षाचालक आणि मालकांची नोंदणीही केली जात असून १५ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनंतर मराठी बोलता न येणाऱ्या चालकांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.


प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये भाषेच्या अडचणीमुळे अनेकदा गैरसमज किंवा वाद निर्माण होतात. हे टाळण्यासाठी आणि स्थानिक भाषेच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. १५ ऑगस्टच्या डेडलाईनमुळे मराठी न येणाऱ्या चालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

Previous

पुण्यातील स्वारगेट-कात्रज अखेरचा बीआरटी पण बंद? स्वारगेट-कात्रज मार्ग इतिहासजमा होणार!

Next

देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात ‘पाण्याचा सातबारा’; आता पाण्याचाही ठेवला जाणार हिशोब!

Related Posts

Rajiv Gandi, Atal Bihari Vajpayee: राजकारणातली माणुसकी: राजीव गांधी–वाजपेयी किस्सा

Rajiv Gandi, Atal Bihari Vajpayee: राजकारणातली माणुसकी: राजीव गांधी–वाजपेयी किस्सा

Leave a Comment / राजकारण / By Team Lagav Batti
जेव्हा मृत्यूशी झुंज देत होते अमिताभ बच्चन, बाळासाहेब धावून आले होते…

जेव्हा मृत्यूशी झुंज देत होते अमिताभ बच्चन, बाळासाहेब धावून आले होते…

Leave a Comment / मनोरंजन, राजकारण / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top