Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

NEETपासून भरती परीक्षांपर्यंत पेपरफुटीला आता ब्रेक! केंद्र सरकारचा मोठा निर्णय

By Team Lagav Batti / July 25, 2026

देशभरातील स्पर्धा आणि भरती परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अँटी-पेपर लीक कायद्यातील सुधारणा विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पेपरफुटी करणाऱ्या टोळ्या आणि परीक्षा गैरप्रकारांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर आता अधिक कठोर कारवाईचा मार्ग मोकळा होणार आहे.

काय आहे केंद्राचा प्लॅन?


1)पेपरफुटीच्या प्रकरणांची सुनावणी जलद व्हावी, यासाठी फास्ट-ट्रॅक कोर्टची तरतूद करण्यात आली आहे.
2)पेपरफुटी करणाऱ्या टोळ्या, संघटित रॅकेट्स आणि परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे नुकसान होऊ नये, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.
केंद्र सरकारच्या २०२४ च्या ‘Public Examinations (Prevention of Unfair Means) Act’ अंतर्गत UPSC, SSC, रेल्वे, बँकिंग भरती आणि NTAच्या काही परीक्षांसह सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्याची तरतूद आहे.

१० वर्षांची शिक्षा आणि १० कोटींचा दंड
प्रस्तावित सुधारणांनुसार, गंभीर स्वरूपाच्या पेपरफुटी आणि संघटित परीक्षा गैरप्रकारांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर शिक्षा होऊ शकते. यामध्ये १० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १० कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याचे सांगितले जात आहे.
NEET-UGसह विविध स्पर्धा आणि भरती परीक्षांमधील कथित गैरप्रकारांनंतर परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
केंद्राच्या या निर्णयामुळे पेपरफुटी आणि परीक्षा गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई अधिक वेगाने आणि कठोरपणे होण्याची शक्यता आहे. या सुधारणांमुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Previous

MPSC कडून राज्यसेवा निवड प्रक्रियेत मोठा बदल; मुलाखतीचे गुण 275 वरून 175 वर

Next

21 हजारांवरून थेट 7वा क्रमांक! MPSC Drugs Inspector परीक्षेच्या निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह

Related Posts

Rajiv Gandi, Atal Bihari Vajpayee: राजकारणातली माणुसकी: राजीव गांधी–वाजपेयी किस्सा

Rajiv Gandi, Atal Bihari Vajpayee: राजकारणातली माणुसकी: राजीव गांधी–वाजपेयी किस्सा

Leave a Comment / राजकारण / By Team Lagav Batti
जेव्हा मृत्यूशी झुंज देत होते अमिताभ बच्चन, बाळासाहेब धावून आले होते…

जेव्हा मृत्यूशी झुंज देत होते अमिताभ बच्चन, बाळासाहेब धावून आले होते…

Leave a Comment / मनोरंजन, राजकारण / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top