आज मुंबई-नवी मुंबईसाठी एक खूप मोठी आणि दिलासादायक बातमी आली, ती म्हणजे मंत्रीभूत पायामंडळ समितीने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जाणाऱ्या 35 किलोमीटरच्या मेट्रोला मंजुरी दिली.. या मेट्रोपैकी जवळपास 9 किलोमीटर मेट्रो भुयारी असणार आहे, तर उरलेली संपूर्ण मेट्रो वरून, म्हणजे elevated जाणार आहे. खास करून कुर्ला सारखे जे खूप गजबजलेले आणि महत्त्वाचे भाग आहेत, ते या मेट्रोमुळे थेट जोडले जाणार आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही मेट्रो तीन वेगवेगळ्या मेट्रो मार्गांना जाऊन मिळणारंय.
म्हणजे मेट्रो बदलणं किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं खूप जास्तं सोयीस्कर होणारंय. त्यामुळे मुंबई-नवी मुंबई दरम्यान जो प्रचंड ट्रॅफिकचा त्रास आहे, तो बराचसा कमी होईल, असा अंदाज आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च साधारणपणे 18 हजार कोटी रुपये इतका असेल आणि ही मेट्रो PPP तत्त्वावर उभी केली जाणार आहे. ज्यात केंद्र सरकार 20 टक्के आणि महाराष्ट्र सरकार 20 टक्के VGF देणार, आणि उरलेला सगळा खर्च ppp उचलेल. मूळ प्लॅननुसार ही मेट्रो 5 वर्षांत पूर्ण होणार होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलंय की, ही मेट्रो साडेतीन वर्षांतच पूर्ण झाली पाहिजे, म्हणून त्या दृष्टीने संपूर्ण प्लॅनिंगमध्ये बदल करण्यात येत आहेत. एकंदरीत पाहिलं तर,
ही मेट्रो फक्त दोन विमानतळ जोडणारी नाही,
तर मुंबई आणि नवी मुंबईमधला सगळा महत्त्वाचा भाग जोडणारी एक मोठी सोय ठरणार आहे.
Categories
तंत्रज्ञान
