2026-2027 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी एक अत्यंत नाविन्यपूर्ण घोषणा केली आहे. आता शाळेत केवळ गणित, विज्ञान किंवा भूगोलच नाही, तर ‘कंटेंट क्रिएटिंग’ (Content Creating) चे धडेही दिले जाणार आहेत. बदलत्या काळाची गरज ओळखून घेतलेला हा एक क्रांतीकारी निर्णय मानला जात आहे.

आजच्या युगात सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्म हे केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेले नाहीत, तर ते रोजगाराचे एक मोठे माध्यम बनले आहेत. भारताला जागतिक स्तरावर ‘कंटेंट हब’ बनवण्यासाठी सरकारने शालेय स्तरापासूनच मुलांमध्ये कौशल्य विकसित करण्याचे ठरवले आहे. केवळ व्हिडिओ बनवणे म्हणजे कंटेंट क्रिएशन नाही. इंटरनेटचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, कॉपीराइटचे नियम काय आहेत आणि चुकीची माहिती (Fake News) कशी टाळावी, याचे संस्कारही या धड्यांमधून दिले जातील.
नेमके काय शिकवले जाणार?
• व्हिडिओ एडिटिंग: दर्जेदार व्हिडिओ कसे बनवायचे.
• स्टोरीटेलिंग: आपली गोष्ट प्रभावीपणे कशी मांडायची.
• डिजिटल मार्केटिंग: स्वतःचा ब्रँड कसा तयार करायचा.
• एआय (AI) चा वापर: नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कंटेंट कसा सुधारायचा.
रोजगाराच्या नवीन संधी
अनेक मुले पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी वणवण फिरतात. मात्र, जर त्यांना शाळेतच हे कौशल्य मिळाले, तर ते स्वतःचे स्टार्टअप सुरू करू शकतात किंवा फ्रीलान्सर म्हणून काम करू शकतात. यामुळे ‘क्रिएटर इकॉनॉमी’ला मोठी चालना मिळेल.नयेणारा काळ हा ‘डिजिटल इन्फ्लुएन्सर्स’चा आहे. त्यामुळेच, पारंपारिक शिक्षणासोबत आधुनिक कौशल्यांची सांगड घालून भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी तयार केले जात असल्याचं या घोषणेनंतर बोललं जात आहे.
