अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या विमान अपघातात निधन झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यभर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला असून, आजचा दिवस शासकीय सुट्टीचा असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अजित पवार हे एका खासगी विमानाने बारामतीकडे प्रवास करत होते. सकाळी सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास, बारामती विमानतळावर उतरण्याच्या प्रक्रियेदरम्यान या विमानाला अपघात झाला. लँडिंग करताना विमानाचे संतुलन बिघडल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या विमानात अजित पवार यांच्यासह दोन पायलट, एक क्रू मेंबर आणि एक सुरक्षा अधिकारी (PSO) असे एकूण पाच जण प्रवास करत होते. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले होते. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान सर्वांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
अपघातग्रस्त विमान हे ‘लिअरजेट ४५’ (Learjet 45) प्रकारचे असल्याची माहिती असून, त्याचे संचालन VSR Ventures या कंपनीकडून करण्यात येत होते. या दुर्घटनेची चौकशी विमान अपघात तपास यंत्रणा (AAIB) कडून केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर तीव्र शोक व्यक्त करत, अजित पवार यांचे जाणे हे महाराष्ट्रासाठी भरून न निघणारे नुकसान असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारलाही या घटनेची माहिती देण्यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया देताना, “अजित पवार यांच्या अनुपस्थितीत महाराष्ट्राचं राजकारण बेचव आणि अळणी” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. ही प्रतिक्रिया केवळ राजकीय नाही, तर अनेकांच्या मनात असलेली भावना व्यक्त करणारी ठरते.
शासकीय दुखवट्याच्या काळात राज्यातील सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, शासकीय इमारतींवरील ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहेत. अंत्यविधीविषयीची अधिकृत माहिती कुटुंबीयांच्या संमतीनंतर जाहीर केली जाणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात कठोर निर्णय, स्पष्ट भूमिका आणि कधी गमतीशीर तर कधी थेट बोलणं यासाठी ओळखले जाणारे “दादा” आज अचानक निघून गेले आहेत. पण त्यांच्या निर्णयांची, त्यांच्या उपस्थितीची आणि त्यांच्या आवाजाची पोकळी मात्र दीर्घकाळ भरून न निघणारी आहे.

For web..

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

IIT दिल्लीत ‘समर रिसर्च फेलोशिप 2026’ विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!

देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी संस्था Indian Institute of Technology Delhi (IIT Delhi) ने ‘समर रिसर्च फेलोशिप…

449 वसतिगृहांचं नामांतर; आता ‘मागासवर्गीय’ नाही, महापुरुषांच्या नावाने ओळख!

राज्यातल्या शासकीय वसतिगृहांबाबत एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय. सामाजिक न्याय विभागाने वसतिगृहांच्या नावातून…

प्लास्टिक फुलांवर बंदीचा प्रश्न तापला; Devendra Fadnavis यांची विधानसभेत ग्वाही

महाराष्ट्र विधानसभेच्या सुरू असलेल्या अधिवेशनात भाजपचे आमदार Vikram Pachpute यांनी राज्यातील प्लास्टिक व कृत्रिम फुलांवर…